Who M I

Who M I
Arun

Wednesday, June 17, 2015

..कधी वळणाची,कधी अडचणीची.
कधी गवतातील,कधी जगंलातील.
कधी निसरडी खोल,तर कधी उंच कातळकड्याची..!
ती असते नेहमीची सोबतीला,कधी नेते पाणवठ्या...तर कधी मुक्कामाला.!
सावलीच्या सोबतीने ती देते साथ..नाही त्रासत कधी,देते एक विश्वास.!
वाट नाहीच कधी संपत..आणि नाही ती कधीच चुकतं...ती असते एकाच ठिकाणी,आपणच वेडे...म्हणतो तीला की माझी वाट चुकली.
ती तुमचीच असते ती नाही चुकत.
चुकतो आपण..
तिला असते माहीती सर्वच काही,कारण तीच्यापासुनच बनतात वाटाचे फाटे...
उफराटे असते आपलेच शहाणपण..
शोधीत बसतो नेहमीच वाटाचे लहानपण.!!


Arun

आज मी आहे जसा...तसा कदाचीत नसतो मी...
आज माझा महाराष्ट्र जसा दिसतो...तसाही नसता कदाचीत....
काहीतरी वेगळचं असतं इथे,आणि मी ही असतो कुठल्यातरी कळपात...
पण..नाही...हे घडणं शक्य नव्हतं कारण....
ते होते...त्यांनी पाहिलं,त्यांनी जिंकल,त्यांनी घडवलं..त्यांनी दिलं सर्वांना स्वाभिमानचं जीवनदान....
एका जागीरदाराचा पुत्र स्वप्न पाहतो...आणि ते सत्यात उतरवतो..हे अनकालनीय कार्य..पण झालं तर खरचं.!
राजे शिवराय छत्रपती झाले..
किती आनंद सागर लोटला असेलं त्यावेळी रायगडावर,नुसता जल्लोष झाला असले..
आणि...आणि...
कोणी हसलं असेलं,कोणी आनंदाने रडले असेल...पण त्या जीऊमाऊलीने....काय केले असेल माहीती आहे..?
राजांच्या मुखावरुन आपला हात फिरवुन,मुठी वळुन आपल्या कानाशीलावर कडाऽकडाऽ बोटं मोडली असतीलं..आणि राजांची आलाबला घेतली असेल.!!
धन्य ते महाराज आणि
धन्य व कृतार्थ ती माऊली.!!
तुम्हा दोघांना माझा मुजरा..
__/\__



मी कधीतरी या जीवनाच्या प्रवासात मागे वळून पाहतो..आपण चाललो ती वाट निरखतो,काही मागमूस लागतो का ते पाहतो,पाऊलवाटा शोधतो..तेव्हा..
मागे राहिलेल्या ठळक आठवणी मनात पिंगा घालतात आणि मग नी वेडावतो..वाटतं नको ते भुतकाळाचं ओझ मानगुटीवर..
पण....
जेव्हा मी समोर पाहतो,चालावयाची वाट निरखतो,त्यावेळी मात्र क्षणभर अडखळतो,कशी सरावयाची वाट म्हणुन चिंताग्रस्त होतो,समोरची अवघड वळणे व चढउतार पाहुन दडपतो..पण क्षणभरच..
मग मागील वाट आठवतो,भुतकाळ आठवतो,आणि कसं धैर्याने या वाटासे सामोरा गेलो हे ही पाहतो...
आणि मग एका असीम उत्साहाने आणि आनंदाने समोरच्या वाटेला भिडतो..
तिला म्हणतो ''तु आणि मी आणि माझी सावली,आपण सारेच प्रवासी...तु मला नाही चुकवू शकतं,नाही फसवू शकतं..चल मला घेवून चल.....
जे स्थळ लिहलं आहे,सटवीने माझ्या भाळी.!
घेवून चल मला त्या माझ्या इच्छित स्थळी.!!
.................अरुण.


=======
राजांनी एक ज्योत पेटवली..
स्वराज्याची..जीने उजळून
टाकला मावळी मनाचा गाभारा.
!
वाडी,वस्ती,गावागावातुन
वाहतं राहिला शिवप्रेमाचा अखंड निर्मळ झरा.!
स्वराज्य हे बाळ होतं,जे रागलं
,हुदंडलं,खेळलं,बागडलं याच
गडाच्या सानिध्यात.!
कधी पडलं,कधी अडखळलं तर
कधी उसळी घेवून उठलं..याचं
मावळी रानात.!
बाळसं धरलं त्याने आणि
यौवनही गाठलं इथेच..
स्वराज्याच लग्नही लागलं होतं
इथेचं.!
इथेचं त्याने घेतली होती,उचं
अशी भरारी..गरुडाचे हे घरटे
होते,नजर ज्यांची करारी.!
इंथली माती,लावून भाळी..
हुंगून पहा जराशी,गळून पडेल
ताठा सारा..नजर वळेल पायाशी.!
राजगडाने पाहिल्या आणि जपल्या आहेत राजांच्या पाऊलखुणा..कुठेही जा मित्रानों पण या राजगडला विसरु नका.!
कधी भेटा,केव्हाही भेटा हा उलगडतं राहतो..गतस्मृतींचा पट पुन्हा पुन्हा...
कुठे ही जा मित्रानों...अक्षरशा कुठेही जा...
पण या राजगडला विसरु नका.!!
------------अरुण पाटील


किती वेळ शोधलं तुला..
कुठे ही असं न सागंता जावू नकोस..
मनाची घालमेल होते..तू सोबत नसल्यावर..
अगदी एकटा पडतो मी..आणि मग सैरभैर होतं मन..
तु वचन दिलं आहेस मला,ते विसरु नकोस..
अंतापर्यंत तुझी साथसोबत हवीच आहे..
तुझं नसणं म्हणजे माझ्या अस्तीत्वावर प्रश्नचिन्ह आहे..
आपण कधीही ऎकमेंकापासून दूर नाही राहियचं..हे एखदा ठरवलं आहे..
प्रसंग मग कोणताही असो वा असो कोणतीही वादळवाट..
आपण साथ नाही ऎकमेंकाची सोडायची..
तुला तळपणा-या सुर्यांची भिती नाही वाटतं..त्यावेळी तर खंबीरपणे व गंभीरपणे पाठ नाहीस सोडतं..
साजंवेळी कातरवेळी तुझं जाणं नेहमीचंच आहे..ते माहिती आहे..पटतं ते...
कारण परतुन तु उद्या येणार असतेस..
पण आजकाल त्या काळ्या कृष्णमेघाला तू फार घाबरतेस,असं वाटतं..
काळजी नकोस करु..तो असाच अवचित येतो अन् अवचित निघुनही जातो..
तो बघ..गेला तो..

..आणि तो गेलेला बघून ती खुदकन हसून मला येऊन बिलगली..
---ती 'सावली' माझी.
========= अरुण पाटील

  • हम खुद ही सोच मैं है
    हमारे दिल का हाल कैसे और किसे बताये
    कही हमारा मजाक ना बन जाए।

    आप ही बताओ हम आपको क्या बताये
  • Arun Patil वा..! सुरेख
    मजाक उन्हे बनाया जाता हैं,
    जो हो नियतसे परे.!

    जिसका दिल साफ हैं,
    भला उससे हम क्यों डरे.!
     
    शंभु राजे..
    ..राजे माझे.
    =========
    ज्यांनी आपल्या उणेपुरे बत्तीस वर्षाच्या आयुष्यात सर्व प्रकारच्या प्रवृत्तींचा सामना केला व त्या प्रत्येक प्रवृत्तीच्या छातीवर आपल्या बलिदानाने स्वतःच्या अमरत्वाचा झेंडा रोवला..ते
    शंभु राजे..
    ..राजे माझे
    उतरवयाच्या एका मुस्सद्दी सम्राटाच्या मनात आपल्या धर्माची जेवढी तीव्र लालसा निर्माण झाली...त्याच तीव्रतेने त्याचा प्रतिकार करणारी विचार व आचार सरणी या भारतभु वर निर्माण झाली,त्या आचार व विचार मालेतील कौस्तुभ मणी म्हणजे...
    शंभु राजे..
    ..राजे माझे
    शौर्य व साहस यांचे मुर्तिमंत प्रतिक..युध्द आवडणारा राजकुमार आसा ज्यांचा गौरव केला गेला ते..
    शंभु राजे..
    ..माझे राजे
    सत्व न सोडले कधीही त्याने,
    हसत मिरवल्या मृत्युच्या माला.!
    सई शिवाच्या तेजातुन एक,
    साक्षात रद्र प्रकट झाला.!
    इंद्रस्थान ते पुरंदर पाहुन तयाला मनी हसला.!!
    @अरुण पाटील
     
    तुफान के चलते,हमने अपना रुख बदल दिया हैं| .....मगर मंजील अभी भी वही हैं.!!
    ......इति.अरुण पाटील......
     
    सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।
    अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली पुन्हा नाहीं फिरलि कुणाची सांग ।
    नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
    जशि कळी सोनचाफ्याची न पडु पाप्याची दृष्टी सोप्याची नसंल ती नार ।
    अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढुन सुकुमार ।
    नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
    जशि मन्मथ रति धाकटी सिंहसमकटी उभी एकटी गळ्यामध्यें हार ।
    अंगि तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर मारिते लहर मदन तलवार ।
    पायी पैंजण झुमकेदार कुणाची दार ? कोण सरदार हिचा भर्तार ?
    नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
    नाकामध्यें बुलाख सुरती चांदणी वरती चमकति परति हिच्यापुढे फार ।
    किनकाप अंगिचा लाल हिजपुढे नको धनमाल ।
    कविराज चमकतो हीर लोकशाहीर इतर शाहीर काजवा वांग ।
    नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
    सुंदरा मनामध्ये भरली.. सुंदरा ।
    गीत - शाहीर रामजोशी 

   

No comments:

Post a Comment